शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 सप्टेंबर 2014 (11:07 IST)

अनुष्का म्हणते, नो तमाशा

‘हायवे’नंतर दिग्दर्शक इम्तिाज अलीने ‘तमाशा’ या आपल्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं आहे. कोर्सिका येथील चित्रीकरणानंतर आता या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबईत सुरू आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत रणबीर कपूर आहे. रणबीर या अगोदर इम्तिाजच्याच रॉकस्टार या चित्रपटात दिसला होता. तर अभिनेत्रीच भूमिकेत दीपिका पदुकोण आहे. बॉलिवूड सूत्रांच्या मते, या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्रीची भूमिका दीपिका पदुकोणसाठी नव्हतीच मुळी! या जागी इम्तिाज अनुष्का शर्माला घेण्याचा विचारात होता. तसा प्रस्तावही इम्तिाजने अनुष्काला पाठवला होता. पण अनुष्काने त्याला नकार दिला. यासाठी तिने अनुराग कश्यपच्या बॉम्बे वेल्वेटचं कारण पुढे केलं, असं बॉलिवूड सूत्रांचं म्हणणं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतरच अनुष्का पुढच्या चित्रपटाचा विचार करणार होती. शिवाय या  काळात तिचा को-स्टार रणबीरही व्यस्त होता. त्यामुळे तमाशाचे चित्रीकरण त्यानंतरच शक्य होतं.

असो, पण खरं कारण असं सांगितलं जातं की, अनुराग कश्यपच्या बॉम्बे वेल्वेटमध्ये रणबीर-अनुष्काच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण एकत्र येणं अनुष्काला पटलं नाही. आणि तिने तमाशाला नकार दिला. साहजिकच या जागी दीपिकाची वर्णी लागली. ये जवानी है दीवानी या चित्रपटात रणबीर-दीपिका ही जोडी दिसली होती. या चित्रपटाच्या सुपर सक्सेसनंतर आता हे दोघं तमाशात एकत्र दिसतील.