गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 21 ऑक्टोबर 2014 (16:06 IST)

ऐश्‍वर्या स्वतंत्र आहे!

लग्नानंतर ऐश्‍वर्या राय-बच्चनच्या पुनरागमनाच्या योजनेमध्ये सतत अभिषेक बच्चनचे नाव प्रामुख्याने घेतले जात होते. जे. पी. दत्ता, आर. बाल्की, मणिरत्नम अन्य काही दिग्दर्शकांच्या प्रोजेक्टमध्ये दोघे सोबत दिसणार असल्याची चर्चा होती. ऐश्‍वर्यानेदेखील आपण एकतर नायिकाप्रधान चित्रपटास प्राधान्य देऊ किंवा अभिषेकचा समावेश असणारे रोमँटिक चित्रपट करू, असे सांगितले होते. अभिषेकने मात्र ऐश्‍वर्याच्या या मताचे खंडण करत सध्या तरी दोघांचा एकत्र चित्रपट करण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अभिषेकच्या सांगण्यानुसारच ऐश्‍वर्याने संजय गुप्ताचा 'जज्बा' साइन केला. कारण संजयसोबत चित्रपट करण्याचा अभिषेकचा विचार असल्याची माहिती आहे. यामध्येदेखील अभिषेकने काही तथ्य नसल्याचे सांगितले. अभिषेकने सांगितले की, मी ऐश्‍वर्याला 'जज्बा' करण्यास सांगितले नाही. अशा चर्चा पसरवून नायिका म्हणून तिच्या यशाची किंमत कमी केली जात आहे. तिला कोणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही. तिने नेहमी दमदार कथा आणि भूमिकांची निवड केली आहे. 'जज्बा'मधील भूमिका तिला आवडली आणि तिने होकार दिला. या विषयावर आमची कधीच चर्चा झाली नाही.