शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 एप्रिल 2015 (11:37 IST)

मोदींचे आभार मानावे तेवढे थोडेच: मनीषा कोईराला

नेपाळची नागरिक आणि बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाने नेपाळ भूकंपग्रस्तांना तात्काळ मदत रवाना केल्याबद्दल भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. नेपाळमधील भूंकपाचे टीव्हीवरील दृश्य पाहून

मनीषा कोईरालाला अक्षरश: रडू कोसळले. मनीषा ही नेपाळचे माजी पंतप्रधान बी. पी. कोईराला यांची नात आहे. तिने आपल्या ट्विटर पेजवरुन भारत सरकारचे आभार मानले आहेत.

भारत सरकारने तात्काळ मदत रवाना केली. त्यांचे जितके आभार मानावे तेवढे कमीच आहेत. तर दुसर्‍या पोस्टमध्ये मनीषा म्हणते की, हे सगळं पाहून मला रडूच आलं. भारताकडून पाठविण्यात आलेल्या मदतीसाठी भारत सरकारचे आभार. या अडचणीच्या काळात भारताने केलेली मदत आणि दिलेला पाठिंबा कायमच आमच्या स्मरणात राहील. पंतप्रधान मोदीजी आपले खूप आभार.

नेपाळमध्ये आलेल्या पल्रयंकारी भूकंपामध्ये हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या भूकंपानंतर नेपाळमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. जगभरातून नेपाळसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. मात्र, भारताने तात्काळ मदत रवाना केली असून शेकडो भारतीय नागरिकांनादेखील सुखरूप भारतात परत आणले आहे.