शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. बजेट 2010
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 22 फेब्रुवारी 2010 (12:44 IST)

पाहा आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल

WD
WD
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने देशातील अर्थव्यवस्थेसंदर्भातील अहवाल नुकताच पंतप्रधानांकडे सोपवला आहे. यातील काही मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे:

-चालू वर्षात विकास दर 7.2 टक्के राहणार
-आगामी दोन वर्षात विकास दर 8.2 तर यानंतर नऊ टक्क्यांवर जाणार
-चालू वर्षात कृषी विकास दर 0.2 टक्क्यांनी घसरण्याची भीती.
-औद्योगिक उत्पादन दर 8.6 टक्के राहणार.
-सेवा क्षेत्राचा 8.7 टक्के दराने विकास.
-अन्न-धान्याचे वाढते दर अजून वाढण्याची भीती.
- चालू वर्षात गुंतवणूक दर 36.2 टक्के राहणार.
-निर्यात क्षेत्रातील विकास मंदावल्याने 168.7 अब्ज डॉलर निर्यात राहणार.
-महसूल तोट्यात कपात करण्यासाठी प्रयत्नांची गरज.
-उत्पादनात घसरण होण्याची शक्यता निर्माण झाल्यास आयात करण्यास त्वरित परवानगी मिळाली
पाहिजे.
- अणू ऊर्जा उत्पादनात वाढ करण्यासाठी आयात वाढवावा.