शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

'गुंडे'ची कथा

बॅनर : यशराज फिल्म्स
निर्माता : आदित्य चोपडा
दिग्दर्शक : अली अब्बास जफर
संगीत : सोहेल सेन
कलाकार : प्रियंका चोप्रा, रणवीर सिंह, अर्जुन कपूर, इरफान खान
रिलीज डेट : 14 फेब्रुवारी 2014

WD
जेव्हा ते किमान 12 वर्षांच्या जवळपास असतील तेव्हा त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी पहिल्यांदा पळ काढावा लागला होता. तेव्हा जगाने त्यांना 'रिफ्यूजी' म्हटले होते. ही गोष्ट आहे 1971च्या जवळपासची, जेव्हा युद्धामुळे एक नवीन देश 'बंगला देश'चा जन्म झाला होता. या वेळेच्या जवळपास बाला (अर्जुन कपूर) आणि बिक्रम (रणवीर सिंह)चा जन्म झाला होता. त्यांनी युद्ध आणि त्यामुळे झालेल्या परिणामांना फारच जवळून बघितले होते. त्यांना नेहमी स्वतः:चा बचाव करण्यासाठी लढावं लागत होते. धावत-धावत ते कलकत्ता येऊन पोहोचतात. जगाला ओळखण्याआधी ते स्वत:ला चांगल्या प्रकारे ओळखून घेतात आणि लवकरच पक्के मित्र बनतात.

WD

बिक्रमजवळ डोकं आहे आणि तो दोघांमध्ये मोठा असतो. त्याला बेकायदेशीर धंद्यांची चांगली ओळख असते. तो ज्यांच्याशी प्रेम करतो त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतो.


WD

बिक्रम जर बर्फ आहे तर बाला आग आहे. तो प्रत्येक गोष्टींवरून ताव खातो. शरीराने शक्तीशाली असून फारच वाफादार असतो. तोंडापेक्षा जास्त त्याचे हातपाय चालतात.


WD

बिक्रम आणि बालाला जेव्हा असे वाटू लागते की त्यांचा आता चांगला काळ आला आहे, तेव्हा असे असे काही घडत की ते

परत खाली घसरतात. पण त्या दोघांचा साथ त्यांची सर्वात मोठी ताकद असते.


WD

बरेच वर्ष निघून जातात, बिक्रम आणि बाला कलकत्ताचे दबंग, कुख्यात आणि उधमी गुंडे बनतात. त्यांच्याजवळ सर्व काही

असते तेव्हा एंट्री होते कॅब्रे डांसर नंदिता (प्रियंका चोप्रा)ची.


WD

बिक्रम आणि बालाप्रमाणे नंदिताचे नाव देखील कलकत्तामध्ये प्रसिद्ध असते. दिवसा कॉलगर्ल दिसणारी नंदिता संध्याकाळी कॅबरे डान्सच्या रूपात लोकांसमोर येते. ती नाइट क्लब आणि सर्वात सुंदर डांसर असते. तिच्या सुंदरतेचा जादू बाला आणि बिक्रमवर देखील आपली छाप सोडतो.


WD

नंदिताचे बाला आणि बिक्रमच्या जीवनात आल्याने त्यांच्या जीवनात नवीन आशेचे किरण जागते. ते दोघेही फार खूश राहू

लागतात, पण त्यांना येणार्‍या तुफानाची थोडीही आशंका नसते.


WD

एसीपी सत्यजित सरकारची एंट्री होते. कायदा तोडणार्‍यांना कायदा चांगल्या प्रकारे शिकवता येतो. तो डोक्याने तल्लख बुद्धीचा असतो आणि त्याच्यात परिस्थितीला जाणून घेण्याची कला असते.


WD

त्यानंतर सुरू होते एक सनसनीखेज, रोमांचक आणि ड्रामेटिक कथा जी या चौघांच्या आजूबाजूस घुमते.