'रब ने बना दी जोडी' असामान्य प्रेमकथा
निर्माता - यश चोप्रा, आदित्य चोप्रा दिग्दर्शन, कथा-पटकथा, संवाद - आदित्य चोप्रा गीतकार - जयदीप साहनी संगीतकार - सलीम-सुलेमानकलाकार - शाहरुख खान, अनुष्का शर्मा (नवा चेहरा), विनय पाठक, विशेष भूमिका- काजोल, रानी मुखर्जी, प्रीति झिंटा आणि प्रियंका चोप्रा प्रदर्शित होण्याची तारीख - 12 डिसेंबर 2008 प्रेमासाठी गरीब-श्रीमंत, जाती-पातीची बंधने नाहीत. सामान्य माणूसही कोणावर प्रेम करू शकतो. प्रेम ठरवून करता येत नाही काही कळायच्या आत ते होते. असाच धागा पकडून 'रब ने बना दी जोड़ी' ची निर्मिती करण्यात आली आहे. जो प्रेमात पडतो त्याला अविस्मरणीय अनुभव येतात. असाच अनुभव चित्रपटातील सुरिंदर साहनी (शाहरुख खान) ला आला आहे. दिसण्यास एकदम साधारण व्यक्ती असणारा सुरिंदर मनानेही तितकाच निर्मळ आणि साधा आहे. तो पंजाब पॉवरमध्ये नोकरी करतो. जीवनात उदास असणा-या नीरसची भेट एकदिवस तानी (अनुष्का शर्मा) शी होते. सुरिंदर जेवढा उदास आहे त्याउलट तानी बिनधास्त आहे. ती जीवनाचा पुरेपुर आनंद उठवत असते. अपघाताने त्या दोघांची भेट होते. यानंतर हसू, अश्रू, आनंद, दु:ख, संगीत, नृत्य आणि प्रेमाने ही कथा पुढे जाते. सामान्य लोकही असामान्य प्रेम करू शकतात, हा विश्वास ही जोडी देते.