बरं या वस्तू दिल्यानेच हा दिवस साजरा करता येतो असेही नाही. काही जण नि:शब्दपणेही हा साजरा करतात. आपल्या मित्र-मैत्रिणीची या दिवशी प्रकर्षाने आठवण आली तरी आपण त्याच्या मैत्रीला जपल्या सारखेच आहे. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेतला बाजारात या दिवशी अनेक शुभेच्छा पत्र आपल्याला पाहायला मिळतील. यात मजकुराची वानवा मुळीच नसते. ‘माझ्याशी मैत्री करशील का’, ते एखादा मित्र नाराज असेल तर ‘सॉरी’ च्या मजकुरापर्यंत सारे काही या शुभेच्छा पत्रात आपल्याला मिळते.
भाषेचं कुंपण या शब्दांना नसल्याने इंग्रजी ते मराठी पर्यंतचा प्रवास या ओळींचा असतो. या ओळीच इतक्या आकर्षक असतात, की त्यांची भुरळ प्रत्येकालाच पडेल. आजकाल मागची पिढी म्हणजेच पालकही हा दिवस साजरा करत आहेत. माझी आईही तिच्या मैत्रिणीला शुभेच्छा पत्र देते. तिलाही वाटतं आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणीला काही तरी द्यावं.
आता हा दिवस इतका महत्त्वाचा असेल तर तो साजराही तशाच पद्धतीने व्हायला हवा ना? मग लागा तयारीला.. आणि आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत हा दिवस आनंदात साजरा करा.