शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: अलिराजपूर , मंगळवार, 22 एप्रिल 2014 (11:10 IST)

पत्नीला सांभाळू न शकणारे देश काय सांभाळेल?

'जो व्यक्ती आपल्या पत्नीला सांभाळू शकला नाही, तो देश काय सांभाळेल?, असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह यांनी पुन्हा एकदा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे. मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथील प्रचारसभेत दिग्विजयसिंह बोलत होते.

दिग्विजय म्हणाले, मोदी खोटारडे आहेत. गुजरातचा विकास हा एका व्यक्तीने केलेले नाही. कॉर्पोरेट लॉबीने हा विकास केला आहे. गुजरातमध्ये 2002 मध्येउसळलेल्या जातीय दंगलीला मोदी जबाबदार आहे. त्यांच्यामुळे अनेक निष्पाप आदिवासींना तुरुंगात जावे लागले. मोदींनी आतापर्यंत अविवाहीत असल्याचे संपूर्ण जगाला सांगितले होते. मात्र आता त्यांचे पितळ उघडं पडलं आहे. जशोदाबेन ही त्यांची पत्नी असूनदेखील त्यांनी देशाशी खोटे बोलले आहे. जो व्यक्ती आपल्या पत्नीचा सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार? असा खोचक सवालही विचारला आहे.

दुसरीकडे, दिग्विजयसिंह यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.