शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. हनुमान जयंती
Written By वेबदुनिया|

बजरंगबली की जय

WD
हनुमानापासून काय शिकायचे तर त्याचा विनम्रपणा. शक्तीशाली असूनही विमन्रता त्याच्यात होती. म्हणूनच तो अत्युच्चपदाला पोहोचला. केवळ भुजात बळ आहे, म्हणून दादागिरी करणार्‍या आजच्या 'बलभीमांनी' हनुमंताकडून ही गोष्ट आवर्जून शिकली पाहिजे. एखादी बलवान व्यक्ती कुणापुढे झुकत असेल तर तो नक्कीच विनम्रपणा समजावा. बुध्दी व बळ यांचा संयोग त्याच्या ठिकाणी असतो, हे लक्षात घ्यावे.

श्रीराम व सुग्रीव यांचे कोणतेच काम हनुमानाशिवाय पूर्ण होत नव्हते. हनुमान दोन्ही हात जोडून त्यांच्यापुढे उभे राहत असत. रावणाने हनुमानाच्या नम्रतेला लाथाडून त्याच्याशी चार हात करण्याची हिंमत दाखवली आणि त्याला आपली सोन्याची लंका जळालेली बघावी लागली.

बुद्धी व शक्ती यांच्या मीलनापुढे कुणाचेही काहीही चालत नाही. भारतीय संस्कृतीत दोन महावीर मानले जातात. ते म्हणजे हनुमान व वर्धमान. एक परम भक्त तर दूसरे अहिंसेचे पुजारी. अहिंसकतेशिवाय भक्ती अशक्य आहे. 'जय हनुमान' म्हटल्यानेही संकट, भीती दूर झाल्यासारखे वाटते.

अंजनी पुत्र : सुमेरु पर्वताचे राजा केसरी हे हनुमानाचे पिता होते. अंजना ही माता असल्याने हनुमानाला अंजनी पुत्र म्हटले जाते.

पवन पुत्र : हनुमानाला पवनपुत्रही म्हटले जाते. वायुला मारूत म्हटले जाते. मरूत म्हणजे वायु. त्यावरून हनुमानाला मारूती असे म्हटले जाते. पवनाच्या वेगासमान हनुमानामध्ये उडण्याची शक्ती असल्याने पवनपुत्र असेही म्हणतात.

हनुमान : इंद्रदेवाच्या वज्रप्रहाराने हनुमानाची हनुवटीला जबर मार लागला होता. तेव्हापासून पवनपुत्राचे नाव हनुमान म्हणून प्रचलित झाले होते.

बजरंगबली : वज्राला धारण करणारे व वज्रासारखे टणक अर्थात बलवान शरीर असलेल्या हनुमानाला बजरंगबली (बजरंगबली) असे म्हटले जाऊ लागले.