शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शनिवार, 3 डिसेंबर 2016 (17:18 IST)

महाभारताच्या 8 अशा गोष्टी ज्या फारच कमी लोकांना माहित आहे!

महाभारत एक असा महाकाव्य आहे, ज्याच्याबद्दल पूर्ण जगाला माहित आहे पण अशा लोकांची सख्या फारच कमी आहे ज्यांनी त्याला पूर्ण पठण केले आहे. वेळे वेळेवर बर्‍याच टीव्ही मालिका महाभारताच्या आधारावर तयार करण्यात आल्या आहेत.  
 
महाभारताच्या 8 अशा गोष्टी ज्या फारच कमी लोकांना माहीत आहे  
महाभारत एक असा महाकाव्य आहे, ज्याच्याबद्दल पूर्ण जगाला माहीत आहे पण अशा लोकांची सख्या फारच कमी आहे ज्यांनी त्याला पूर्ण पठण केले आहे. वेळे वेळेवर बर्‍याच टीव्ही मालिका महाभारताच्या आधारावर तयार करण्यात आल्या आहेत.  
 
28व्या वेदव्यासने लिहिली महाभारत
जास्तकरून लोकांना असे वाटते की महाभारत वेदव्यास यांनी लिहिली होती. पण हे पूर्ण सत्य नाही आहे. वेदव्यास कोणी नाव नाही, बलकी एक उपाधी होती, जे वेदांचे ज्ञान ठेवणार्‍यांना दिली जात होती. कृष्णद्वैपायन आधी 27 वेदव्यास होऊन चुकले होते, जेव्हा की ते स्वत: 28वे वेदव्यास होते. त्यांचे नाव कृष्णद्वैपायन यासाठी ठेवण्यात आले होते, कारण त्यांचा रंग सावळा (कृष्ण) होता आणि ते एका द्वीपावर जन्मले होते.  
 
गीता फक्त एक नाही
असे मानले जाते की श्रीमद्भगवद्गीता ही एकटी गीता आहे, ज्यात कृष्णाने दिलेल्या ज्ञानाचे वर्णन आहे. हे खरं आहे की श्रीमद्भगवद्गीताच  संपूर्ण आणि प्रामाणिक गीता आहे, पण याच्याशिवाय कमीत कमी 10 गीता अजून आहे. व्याध गीता, अष्टावक्र गीता आणि पराशर गीता त्यातूनच एक आहे. 
राश्या (रास) नव्हता ज्योतिष्याचा आधार
महाभारताच्या काळात राश्या नव्हत्या. ज्योतिष 27 नक्षत्रांवर आधारित होते, न की 12 राश्यांवर. नक्षत्रांमध्ये पहिल्या स्थानावर रोहिणी होती, न की अश्विनी. जसा जसा काळ बदलत गेला, विभिन्न सभ्यतांनी ज्योतिष्यामध्ये प्रयोग केले आणि चंद्रमा आणि सूर्याच्या आधारावर राश्या बनवल्या.  
 
चार सारणीवाले फासे   
शकुनीने ज्या फाशांने पांडवांचा चॉसर खेळात पराभव केला होता, असे म्हणतात की त्याचे 4 सारणी होते. सामान्य प्रमाणे लोकांना  6 सारणी असणारे फाशांबद्दल माहीत आहे. पण महाभारतात त्या चार फासे असणार्‍या चौकटीच्या आकृतीचा उल्लेख करण्यात आला नाही आहे. हे देखील सांगण्यात आलेले नाही आहे की ते कुठल्या धातू किंवा पदार्थाने तयार करण्यात आले होते. महाभारताप्रमाणे, त्या फाश्याचा प्रत्येक चौरस एक-एक युगाचा प्रतीक होता. चार बिंदू असणार्‍याचा अर्थ सतयुग, तीन बिंदूचा अर्थ त्रेतायुग, दोन बिंदूचा अर्थ द्वापारयुग आणि एक बिंदूचा अर्थ होता कलियुग.  
 
मंत्रांच्या माध्यमाने बनत होते ब्रह्मास्त्र
जास्तकरून लोकांमध्ये हीच मान्यता प्रचलित आहे की ब्रह्मास्त्र दैवीय अस्त्र होते, जे देवतांच्या तपस्येनंतर प्राप्त होत होते. पण हे देखील पूर्ण खरे नाही आहे. काही ब्रह्मास्त्र स्पष्ट दिसत होते, पण काही असे ही होते की ज्यांना मंत्रांच्या शक्तीने संहारक अस्त्र बनवले होते. जसे, रथाच्या चाकेला चक्र बनवून देणे. मंत्रोच्चारणासोबत ब्रह्मास्त्र शत्रूचे शीर कापण्यात येत होते. पण एक खास बाब म्हणजे मंत्रांच्या माध्यमाने त्यांना  कुचकामी देखील करण्यात येत होते आणि त्यांचा वापर त्यांच्यावरच होत होता ज्यांच्याजवळ त्याचे अधिकार होते.  
विदेशी देखील सामील झाले होते या लढाईत
भारतीय युद्धांमध्ये विदेशी लोकांचे सामील होण्याचा इतिहास फारच जुना आहे. महाभारताच्या लढाईत देखील विदेशी सेना सामील झाली होती. ही वेगळी गोष्ट आहे की जास्तकरून लोकांना असे वाटत आहे की महाभारताची लढाई फक्त कौरव आणि पांडवांच्या सेनेत झाले होती.  पण असे नाही आहे. मूलभूत महाभारतात ग्रीक आणि रोमन या मेसिडोनियन योद्धांचे लढाईत सामील होण्याचे प्रसंग येतात.  
 
दुःशासनाच्या पुत्राने मारले होते अभिमन्यूला  
भले असे मानले जाते की अभिमन्यूची हत्या चक्रव्यूहामध्ये सात महापुरुषांद्वारे करण्यात आली होती. पण हे पूर्ण खरे नाही आहे. मूलभूत महाभारतानुसार, अभिमन्यूने बहादुरीने लढत चक्रव्यूहामध्ये उपस्थित सातापैकी एक महापुरुषा(दुर्योधनाचा मुलगा)ला ठार केले होते. याने नाराज होऊन दुःशासनाच्या मुलाने अभिमन्यूची हत्या केली होती.  
 
तीन चरणांमध्ये लिहिली आहे महाभारत
वेदव्यासच्या महाभारताला निःसंशयपणे मूलभूत मानले जाते, पण ती तीन चरणांमध्ये लिहिण्यात आली होती. पहिल्या चरणात 8,800 श्लोक, दूसर्‍या चरणात 24 हजार आणि तिसर्‍या चरणात एक लाख श्लोक लिहिण्यात आले. वेदव्यास यांचं महाभारता शिवाय भंडारकर ओरिएंटल रिसर्च इंस्टिट्यूट, पुण्याची संस्कृत महाभारत सर्वात प्रामाणिक समजली जाते. इंग्रजीत संपूर्ण महाभारत दोन वेळा अनुवादित करण्यात आले होते.