शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 मार्च 2017 (09:01 IST)

पाकिस्तानी मुलीकडून मोदींचे अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशमधील मिळवलेल्या विजयाचं अभिनंदन करण्यासाठी एका पाकिस्तानी मुलीनंही पत्र लिहिलं आहे. यात  भारत आणि पाकिस्तानमध्ये शांती नांदावी, यासाठी काम करण्याचं आवाहन तिन केल आहे.  अकीदत नाविद (11) अस तिच नाव आहे.  पत्रात ती म्हणते, प्रिय मोदीजी, एकदा मला माझे वडील म्हणाले होते, की लोकांची मनं जिंकणे हे अद्भुत कार्य आहे. कदाचित तुम्ही भारतीयांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच तुम्ही उत्तर प्रदेशच्या निवडणुकांत विजय मिळाला आहे. मात्र मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला पाकिस्तानी आणि भारतीयांची मनं जिंकायची असतील तर दोन्ही देशांत शांती नांदणं गरजेचं आहे, यासाठी तुम्ही मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे. दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्याची गरज असून, शांतीचा पूल उभारला पाहिजे. तुम्ही ठरवा की एकमेकांकडून काय खरेदी करायचं आणि काय नाही. तुम्ही एकमेकांकडून बुलेट खरेदी करू नका, मात्र पुस्तकं नक्कीच विकत घ्या, दोन्ही देशांनी एकमेकांकडून गन खरेदी करू नका, मात्र औधषं तर खरेदी करू शकता. शेवटी निवड ही आपलीच आहे. शांती की वाद यात काय निवडायचं हे तुम्हीच ठरवणार आहात. तुम्हाला तुमच्या विजयासाठी पुन्हा एकदा अभिनंदन.