मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: कराची , शुक्रवार, 29 जुलै 2016 (14:49 IST)

काश्मीरमध्ये आंदोलकांचे नेतृत्व लष्करने केले : हाफीज सईद

काश्मीरमध्ये खदखदणाऱ्या असंतोषामागे पाकचा हात आहे, या भारताच्या प्रतिपादनाचा पाक सरकार इन्कार करत असतानाच जमात-उद-दवाचा प्रमुख हाफीज सईदने हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणीच्या मृत्यूनंतर रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांचे नेतृत्व लष्करच्या एका म्होरक्याने केल्याचे सांगितले.

वणीच्या मृत्यूनंतर पाकमधील फैसलाबादहून अनेक लोक काश्मीरमध्ये गेले. त्यापैकी काहींनी ‘हौतात्म्य’ही पत्करले, अशी फुशारकीही त्याने मारली. सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लष्कर-ए-तोयबाने असंतोष भडकाविला, अशी कबुली देऊन जमात-उद-दवाचा प्रमुख हाफीज सईदने पाकिस्तान सरकारचा खोटेपणा उघडा पाडला.