गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2011
Written By वेबदुनिया|

तिथीनुसार असायला पाहिजे आहार-विहार!

WD

* प्रथमेला पेठा खाणे वर्जित असते. खाल्ल्यास धननाश होतो.
* द्वितीयेला लहान वांगी व फणस खाणे निषेधार्ह आहे.
* तृतीयेला कुरमुरे खाऊ नये. कारण ते खाल्ल्यास शत्रू वाढतात.
* चतुर्थीला मुळा खाणे वर्जित आहे. त्याने धननाश होतो.
* पंचमीला बेल फळ खाल्ल्याने कलंक लागचतो.
* षष्ठीला कडुलिंबाची पाने व त्याने दात घासणे वर्जित आहे. त्यामुळे मोक्षाची प्राप्ती होत नाही.
* सप्तमीच्या दिवशी ताडीचे फळ खाणे वर्ज्य आहे. कारण हे खाण्याने मतीभ्रष्ट होते.
* अष्टमीच्या दिवशी नारळ खाणे वर्जित आहे. ते खाल्ल्यास बुद्धीचा नाश होतो.
* नवमीच्या दिवशी दुधी भोपळा खायला नको. कारण हे खाणे म्हणजे मांसाहार केल्याप्रमाणे आहे.
* दशमीच्या दिवशी कलंबी खाणे निषेधार्ह आहे.
* एकादशीच्या दिवशी गवारीच्या शेंगा खाणे वर्जित आहे.
* द्वादशीच्या दिवशी (पोई) पुतिका खाणे निषेध आहे.
* त्रयोदशीला वांगे खाणे वर्जित आहे.
* चतुदर्शी, पौर्णिमा, अमावस्या, संक्रांती, अष्टमी, रविवार, श्राद्ध व उपासाच्या दिवशी तिळाचे तेल, लाल रंगाच्या भाज्या व तांब्याच्या पात्रात जेवण करणे वर्ज्य आहे.
* रविवारी आले खाऊ नये.
* कार्तिक महिन्यात वांगी व मार्गशीर्ष महिन्यात मुळा खाणे वर्जित असते.
* उभे राहून पाणी प्यायला नको.
* जेवण संतापच्या भरात तयार केले असेल वा ते कुणी ओलांडून गेले असेल तरीही ते जेवण करायला नको. कारण ते अन्न राक्षसी असते.
* ज्या लोकांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल त्या लोकांनी रात्री दही व सातू खाऊ नये. हे अन्न रात्री ग्रहण केले तर मोक्षप्राप्ती होत नाही.