शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 21 डिसेंबर 2016 (17:36 IST)

प्रेमाला जात नसते मांडणारे स्टार प्रवाहचे ‘पुढचे पाऊल’

स्टार प्रवाहवरच्या ‘पुढचे पाऊल’ या मालिकेत सध्या सुरु असलेल्या एपिसोडिक कथेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.अक्कासाहेबांच्या कोल्हापुरात सत्यजित  आणि तेजस्विनीची बहरणारी ही प्रेमकथा वेगळी आहे.
 
कोणी कोणाची जात पाहुन, कोणी कोणाला आवडत नसते, प्रेमात ही अटच नसते. प्रेमाची स्वत:ची एक भाषा आणि प्रेमात स्वत:च एक जगणं असतं.  जात बघून प्रेमात पडता येत नाही. पण अशा प्रेमाचे लग्नात रुपांतर होताना होणारा संघर्ष आज आधुनिकतेच्या जगातही कायम आहे. हा संघर्ष टाळता येऊच शकणार नाही का? हा महत्वाचा प्रश्न खूप संयत आणि वास्तवदर्शी पद्धतीने या मालिकेतून उलगडत आहे.विशेष म्हणजे प्रगत समजल्या जाणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रातले हे अस्वस्थ करणारे वास्तव आहे,पण ते मांडताना कुठलाही फिल्मीपणा टाळून ‘पुढचे पाऊल’ या वास्तवावर एक वेगळा दृष्टीकोन मांडते. मालिका विश्वात दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अक्कासाहेबांचे हे ‘पुढचे पाऊल’ म्हणूनच वेगळे ठरते आहे.
 
संकटातून मार्ग काढणाऱ्या,प्रश्नांची अचूक उकल करणाऱ्या  अक्कासाहेब,सत्यजित  आणि तेजस्विनीच्या प्रेमकहाणीत नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. अक्कासाहेबांच्या सरदेशमुख कुटुंबासोबत श्रीकांत देसाई,मयूर खांडगे,आरती मोरे,अमित खेडेकर,संदीप जुवाटकर,नीता वझे,फ्रान्सिस ऑगस्टिन या अभिनयसंपन्न कलाकारांच्या सहभागाने हा कथाभाग विशेष रंगतो आहे.