गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 23 फेब्रुवारी 2019 (15:30 IST)

पाकला पराभूत करून पुलवामाचा बदला घ्या

16 जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात साना होणार आहे. परंतु या सामन्यात  पाकिस्तानचा पराभव करून पुलवामा हल्ल्याचा बदला घ्या, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यकत केले आहे. 
 
आसीसी विश्वचषक 2019 क्रिकेट स्पर्धा इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरु होणार आहे. सामन्यावर बहिष्कार टाकून पाकिस्तानला फुकटचे 2 गुण का द्यायचे? असा सवाल तेंडुलकर याने केला आहे. 
 
भारताने पाकिस्तानवरील वर्चस्व कायम राखायला हवे. त्यामुळे विश्वचषकात भारताने पाकिस्तानला पराभूत करावे आणि आपली ऐतिहासिक विजयी घोडदौड सुरूच ठेवावी, असेही सचिन म्हणाला. 
 
पुलवामा हल्लच्या दिवशीही सचिनने या हल्लचा तीव्र निषेध केला होता.  मात्र पुलवामा येथील दहशतवादी हल्लच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानशी सामना खेळू नये, असा सूर सर्वत्र उटू लागला आहे.