शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (12:03 IST)

सोडलेले पाच झेल महागात - विराट

पहिल्या कसोटी सामन्यात खराब क्षेत्ररक्षणाबाबत कोहलीने नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला एकाच फलंदाजाचे पाच झेल तर तुम्ही सोडत असाल आणि अकरा धावांमध्ये सात फलंदाज गमावत असाल, तर तुमचा संघ विजयास पात्र नाही, असे मला स्पषट वाटते.  भारताने मागील 9 पैकी 8 कसोटी जिंकल्या होत्या. हा विजयाचा सिलसिला असाच कायम राहावा, असे अनेकांना वाटत होते. पण क्रिकेटमध्ये असे घडतेच. आम्ही पराभूत होणारच नाही, असा विचार करणे चुकीचेच. खराब खेळलो, तर कुठलाही संघ आम्हाला परभूत करू शकतो, कसे कोहली म्हणाला.