वटवृक्ष
- डॉ. सौ. उषा गडकरी
त्या महामानावानं मागं ठेवलेल्यालखलखीत प्रकाशरेषेवरूनकिती काळ चालत आहेअगदी नकळत, परंतु अलगद, विनासायासकोणतेच खाचखळगे, काटेकुटे वाटेत नाहीतकिंवा काट्यांचीच फुलं होत राहावीत घरघडीलाअशी किमयाजणू त्याने आधीच योजून ठेवलेलीम्हणूनच त्याच्या किमयागिरीचं न आश्चर्य, न कौतुकनिसर्गनियमांना जसं आपण धरतो गृहित तसं हे अप्रूपही गृहितच धरलं गेलं आतापर्यंतदाद द्यायचंच राहून गेलंत्याच्या इच्छाशक्तीला आतापर्यंतत्या महामानवाचं सहज जगणं अंगवळणी पडलं आमच्यासमस्यांच्या समुद्राला पालांडून जाण्याचंत्यांच असामान्य धैर्यनवलाईचं नाही वाटलं आम्हालात्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या इन्द्रधनुषीअविष्काराचं मोल कधीच जाणवलं नाही आम्हालाएखाद्याच साध्यासुध्या बोलातूनउभ्या जीवनांच शहाणपण दर्शविण्याचंत्यांच अफाट सामर्थ्यकधीच जोखता आलं नाही आम्हालाप्रचंड वटवृक्षाच्या एखाद्या पारंबीचंवृक्षात रूपांतर व्हावंआणि मग त्या वृक्षालास्वयंभू, स्वायत्त असल्याचा भास होऊन मूळ स्त्रोताचा सहज विसर पडावातसंच काहीसं घडत होतं, घडलं होतंपण अचानक आपल्या मूळ जीवनरसाचा शोध लागावाआणि त्या अमृतधारेच्यासतत प्रवाहात चिंब भिजावंतसं हे आजचं स्मरणथेट मूळ स्त्रोतापर्यंतघेऊन जातंयआणि हृदय कृतार्थेतेची, कृतज्ञतेचीपावती देतंय.