शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2018 (16:22 IST)

ह्या लोकांचे भाग्य बदलतात 35 वर्षांनंतर, हे आहे संकेत

बरेच लोक पितृ दोष, ग्रहण दोष, कालसर्प दोषामुळे फारच त्रस्त असतात. हे योग अशुभ मानले गेले आहे. येथे आम्ही याच्याशी निगडित काही गोष्टी सांगत आहोत  ...
 
हे आहे कालसर्प दोषाचे संकेत  
 
1. वाईट स्वप्न येणे  
2. मनात भिती असणे  
3. रात्री घाबरणे  
4. झोपेत दचकणे    
5. साप दिसणे  
6. मृत्यू दिसणे 
7. एखाद्या छायाचे जवळ उभे असण्याचा भास होणे  
8. यशाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर अपयशी होणे  
9. वाद विवाद होणे  
10. शत्रूंची संख्या वाढणे 
11. एखाद्या मोठ्या आजारावर इलाज असाल तरी त्याचा फायदा न होणे  
 
हे सर्व संकेत सांगतात की व्यक्तींच्या पत्रिकेत कालसर्प दोष आहे.  
 
पत्रिकेत राहू-केतूचे अंश, त्यांची स्थिती, त्यांची दृष्टी बघूनच कालसर्पाची पूजा करणे योग्य आहे. कधी कधी व्यक्ती 35 वर्षाच्या वयापर्यंत आरामाचे जीवन जगतात आणि अचानकच धन हानी होऊ लागते आणि तो जातक निर्धन होऊन जातो. आणि कधी कधी व्यक्ती 35 वर्षांपर्यंत निर्धन असतो आणि अचानकच तो धनवान होतो. असे बदल राहू-केतूमुळे होतात.  
 
राहू-केतू रहस्यमयी ग्रह आहे. ज्या व्यक्तींवर राहू केतूची कृपा होते, तो उंच शिखर गाठतो.  
 
कालसर्प दोषासाठी हे उपाय करू शकता
 
1. प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. जल अर्पित करून सात परिक्रमा घाला.  
 
2. एखाद्या पवित्र नदीत चांदीचे नाग नागीण प्रवाहित करा.  
 
3. शिवलिंगासोबत नागाची रोज पूजा करा.