रोजच्या रोज मूठभर सुकामेवा खाणार्यांमध्ये 30 वर्षात कोणत्याही आजाराने मरण्याच्या शक्यतेत 20 टक्क्यांनी घट झाल्याचे एका संशोधनात आढळले आहे. ज्यांचे सुकामेवा खाण्याचे प्रमाण अगदीच कमी असते त्यांच्यापेक्षा खाणार्यांच्या मृत्युदरात घट झाल्याचे परीक्षणातून जाणवले. या परीक्षणात मृत्यूच्या ठराविक कारणांवर होणारा संरक्षणात्मक प्रभावही पडताळण्यात आला आहे.