अटळ मृत्यू
कीर्तनाच्या वेळी महाराजांनी सांगितले की मृत्यू ही अटळ गोष्ट आहे.
या गावातील प्रत्येक माणूस केव्हा ना केव्हा तरी मरणार आहे.
त्यांच बोलणं ऐकून कीर्तनाला जमलेले सर्व श्रोते रडू लागले.
फक्त एक माणूस मोठ्मोठ्याने हसायला लागला.
महाराजांनी विचारले का हसता???
तो म्हणाला, मी या गावाचाच नाही....