कृती : अंडी आणि बटाटे उकळून त्यांना मधून चिरून घ्यावे. तेल गरम करून त्यात आधी कांदे-लसूण सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावे. नारळाचा बुरासुद्धा परतून घ्यावा. हिरव्या मिरच्या, तिखट, हळद, नारळ व कांदे-लसूण, मीठ, गरम मसाला, आलं आणि कोथिंबिरीची पेस्ट तयार करावी. अंडी आणि बटाट्यात हे मिश्रण सावधगिरीने भरावे.
तेल गरम करून त्यात बाकी उरलेले कांदे व टोमॅटोला परतावे. नंतर त्यात भरलेले बटाटे, अंडी व उरलेला मसाला घालावा. थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे. कोथिंबीर ने सजवून सर्व्ह करावे.