गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

दूर करा वास्तु दोष

वास्तूचे महत्त्व आपल्या जीवनात बरेच असल्याने या विषयाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. वास्तुदोष असल्यामुळे जीवनात अनेक संकटे येतात. या संकटांने घराची सुख-शांती भंग होते. त्यामुळे वास्तुत काही परिवर्तन करून वास्तु दोषापासून आपण मुक्त होऊ शकतो.

* झोपण्याच्या खोलीत उष्टे भांडे ठेवल्याने घरातील महिलेच्या तब्बेतीवर प्रतिकूल परिणाम होतो व क्लेश होतात.
* शयनकक्षात पाणी किंवा जड वस्तू ठेवणे वर्ज्य आहे.
* पायरीच्या खाली बसून कोणतेही कार्य करू नये.
* कुठल्याही दारात अडसर नसावा.
* प्रवेशद्वाराकडे पाय करून झोपल्याने लक्ष्मीचा अपमान होतो.
* कोर्ट कचेरीची फाइल मंदिरात ठेवल्याने खटला जिंकण्यास मदत होते.
* दिवंगतांचे फोटो नेहमी दक्षिणेकडे लावायला पाहिजेत. घरातील घड्याळ मंदगतीने चालत असेल तर गृहस्वामीच्या भाग्यात अडथळा उत्पन्न होतो.
* पलंग कधीही भिंतीला लागून ठेवू नये. त्याने नवरा-बायकोत भांडणे होतात.
* घरातील व्यक्ती बर्‍याच दिवसापासून आजारी असेल तर नैऋत्य कोपर्‍यात (दक्षिण-पश्चिम) त्याला झोपवायला पाहिजे. ईशान्य कोपर्‍यात पाणी ठेवल्याने रोगी लवकर बरा होतो.
* घराच्या प्रवेशद्वारात काळ्या घोड्याची नाल, दुर्गा यंत्र, त्रिशक्ती, आत व बाहेर गणपती किंवा दक्षिणमुखी दारावर हनुमानाचे चित्र किंवा भैरव यंत्र लावून त्याचा फायदा घेऊ शकता. हे लावल्याने भूतबाधा होत नाही.
* औषध-गोळ्या नेहमी ईशान्य कोपर्‍यात ठेवायला पाहिजे. औषध घेताना तोंडसुद्धा त्याच कोपर्‍यात असावे. त्याने
रोगी लवकर बरा होतो.
* एखादे घर एस आकारावर असेल तर ते फारच शुभ असते.