शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 10 एप्रिल 2017 (22:58 IST)

भारत पाकच्या 12 कैद्यांची सुटका करणार नाही

भारत बुधवारी पाकिस्तानच्या 12 कैद्यांची सुटका करणार होता. मात्र, भारतानं निर्णय बदलला असून पाकिस्तानच्या कैद्यांची सुटका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनवाल्यानंतर भारतानंही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. कायदा आणि न्यायाचे मुलभूत नियम न पाळता कुलभूषण जाधव यांना फाशी दिली तर ती आम्ही पूर्वनियोजित हत्या समजू, असं पत्र भारताने पाकिस्तान उच्च आयोगाला लिहिलं आहे.