गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 ऑगस्ट 2016 (17:07 IST)

'PAK नरक नाही' असे म्हणणे राम्याला पडले महागात!

पाकिस्तानी लोकांवर विधान करताना अभिनेत्री ते नेता बनलेली रम्याला भारी पडले आहे. कर्नाटकाचे मजिस्ट्रेट कोर्टाने तिच्याविरुद्ध देशद्रोह असण्याची केस चालवण्याची मागणी केली आहे.  
 
कन्नड चित्रपटांची अभिनेत्री आणि काँग्रेसची नेता रम्याने रक्षा मंत्री मनोहर पर्रिकर यांचे 'पाकिस्तान जाणे नरक सारखे अनुभव होते' या विधानावर म्हटले होते की, 'पाकिस्तान नरक नाही आहे, तेथील लोक बिलकुल आपल्यासारखे आहे. ते आमच्याशी फारच चांगल्या पद्धतीने  वागले...'
 
यानंतर काँग्रेस पक्षाच्या या 33 वर्षीय नेता रम्याची सोशल मीडियावर 'राष्ट्रविरोधी' विधान दिल्याबद्दल फारच फजिती झाली आहे.  
 
लोकतंत्रात सर्वांना आपली गोष्ट म्हणायचा अधिकार
ऍक्टर ते लीडर बनलेली रम्याने पूर्ण विवादावर विधान देत म्हटले आहे की लोकतंत्रात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. कोणीही कुणावर आपले विचार लादू शकत नाही. एवढंच नव्हे तर तिने म्हटले की मला नाही वाटत की मी चुकीची आहे. मी बांगलादेश आणि श्रीलंकेला देखील पसंत करते. याचा अर्थ असा नव्हे की मी भारत सोडून जाईन. हे माझा घर आहे, न तर मी आपले घर सोडीन ना आपल्या कुत्र्यांना.