गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

एअर इंडियाचं विमान एरोब्रीजला धडकलं

मुंबई- मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईहून रियाधला निघालेलं एअर इंडियाचं विमान टेक ऑफ करताना एरोब्रीजला धडकलं. मोठा अपघात थोडक्यात टळला. दरम्यान, या विमानातील सर्व 300 प्रवासी सुखरुप असून विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
या धडकेत विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनाचं किरकोळ नुकसान झालं आहे.
 
एआय 922 रियाध-मुंबई हे विमान पार्क करत असताना मार्गदर्शक सिस्टिमने चुकीची माहिती दिल्यामुळे ही घटना घडल्याचं समजतं.