गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 18 डिसेंबर 2014 (10:40 IST)

पाकिस्तानमधील हल्यामागे भारत : हाफीज

पेशावरमधील तालिबान्यांनी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यासाठी भारताचे पाठबळ होते, अशा शब्दात मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद बरळला आहे. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनीही तसाच कांगावा सुरु केला आहे.
 
पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना अफगाणिस्तान आणि भारताचे पाठबळ होते, असे मुशर्रफ यांनी म्हटल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. या हाफीज सईद यानेही भारतालाच जबाबदार धरले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच काश्मीरला स्वतंत्र केल्याचे आवाहन करणार्‍या हाफिज सईदचे ट्विटर खाते बंद करण्यात आले होते.