गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (17:15 IST)

भारताचा हल्ला हा बरोबर आहे - शहीद संदीपचे नातेवाईक

आपल्या भारतीय सैन्याने केलेली कारवाई ही फार मोठी असून त्यामुळे आम्हाला भारतीय सैन्यावर अभिमान असून अजून अतेरेकी मारले पाहिजे असे मत उरी हल्ल्यात शहीद संदीप ठोक यांचे जिजाजी ज्ञानेश्वर चव्हाणके यांनी व्यक्त केले आहे. आमच्या घरातील कर्ता तरुण मुलगा गेला, पाकिस्थानीलोकांनी अश्या भ्याड हल्ले केले त्यामुळे आमच्या भावना तीव्र असून भारताने अजून हल्ले केले पाहिजे आपण आपले दोन गमावले तर त्यांचे २०० मारले पाहिजे असे मत चाव्ह्नाके यांनी व्यक्त केले आहे. 
 
शहीद जवान संदीप ठोक यांच्या आई-वडिलांना आज सकाळी या हल्ल्याची बातमी कळली त्यामुळे त्यांना बरे वाटले मात्र आपले इतर सैनिक वीर मरण येऊ नेये असे त्यांना वाटते, अजूनही युद्धाची भीती वाटते असे मत त्यांनी व्यक्त केले असेही चव्हाणके यांनी सागितले आहे. आमच्या शहीद झालेल्या मुलांच्या वीर पुत्रांना ही श्रद्धांजली असून अजून हल्ले केले पाहिजे आणि आतंकवादी आणि देश घातकी पाकिस्थानी लोकांना मारले पाहिजे असेही शहीद संदीपच्या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केले.