शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (13:20 IST)

भारतीय सेनेने PoK सीमा ओलांडून पाकिस्तानला धडा शिकवला

पुच्छ आणि उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवानांच्या शहादतचा बदला भारताने पाकिस्तानच्या सीमेत जाऊन दहशतवाद्यांना ठार करून घेतला आहे. DGMO आणि विदेश मंत्रालयाची संयुक्त पत्रकारपरिषद घेऊन ही माहिती दिली आहे की लष्कराने बुधवारी रात्री नियंत्रण रेषेला ओलांडत पाकिस्तान अधिकृत काश्मिरात सर्जिकल स्ट्राइक केला.  
 
डीजीएमओ यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले की भारतीय लष्करांनाकडून वृत्त मिळाले होते की पाकिस्तानच्या माध्यमाने दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्यास तयार आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या जमिनीवर आपले सर्वात उत्तम कमांडो पाठवले होते.   सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार भारतीय लष्कराने प्रथमच या प्रकारच्या ऑपरेशनात वायुसेनेची मदत घेतली नाही आणि भारतीय लष्कर बगैर कुठले ही इजा न होता सुरक्षित परतले आहे.  
 
दहशतवाद्याने कबूल केले PAK कनेक्शन
प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये सांगण्यात आले की उरी आणि पुच्छ हल्ल्यात मरण पावले दहशतवाद्यांचे डीएनए सँपलने माहीत पडले आहे की ते   पाकिस्तानी आहे. भारत हे सँपल पाकिस्तानला देण्यास तयार देखील आहे. दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग मिळण्याची गोष्ट देखील कबूल केली आहे. ही घोषणा देखील करण्यात आली आहे की भारतीय लष्कर कुठल्याही परिस्थितीसाठी तयार आहे.  
 
राष्ट्रपती, अपक्षाला देण्यात आली आहे माहिती
वृत्तानुसार भारतीय लष्कराने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, जम्मू-काश्मिराचे राज्यपाल आणि मुख्यमंत्रींना   देखील सर्जिकल स्ट्राइकची पूर्ण माहिती दिली आहे.  
 
नवाज शरीफ यांनी केली निंदा
पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांना ठार मारल्याबद्दल नवाज शरीफ यांनी निंदा केली आहे. PAK मीडियानुसार पीएम नवाज शरीफ यांनी म्हटले 'आम्ही या हल्ल्याची निंदा करत आहोत, शांतीसाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत, त्याला आमची कमजोरी न समजण्यात यावी.'