शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 (09:36 IST)

मुस्लिमांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा: साक्षी महाराज

लखनौ- वादग्रस्त व्यतव्ये केल्यामुळे चर्चेत आलेले भाजपचे खासदार साक्षी महाराज आणि योगी आदित्यनाथ यांनी देशातील मुस्लिमांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करतानाच ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे.

जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यामध्ये मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा वेग अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर आदित्यनाथ आणि साक्षी महाराज यांनी हे मत व्यक्त केले. हिंदूंनी किमान चार अपत्यांना जन्म द्यावा, असे मत साक्षी महाराज यांनीच काही महिन्यांपूर्वी व्यक्त केले होते.