Last Modified: दिल्ली , शनिवार, 18 एप्रिल 2015 (11:13 IST)
राहुल गांधी यांची आज शेतकर्यांची भेट
वादग्रस्त भूसंपादन विधेयकाबाबत शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मायदेशी परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी विविध राज्यांतील शेतकर्यांच्या शिष्टमंडळांना भेटणार आहेत.
भूसंपादन कायद्याच्या निषेधार्थ येत्या रविवारी काँग्रेसने ‘किसान रॅली’चे आयोजन केले आहे. या रॅलीच्या एक दिवस आधी राहुल शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशातील विविध शेतकरी संघटनांच्या सदस्यांना ते भेटणार आहेत.