शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पाटणा , शुक्रवार, 29 एप्रिल 2016 (11:03 IST)

वाढत्या तापमानामुळे बिहारमध्ये हवनवर बंदी

वाढत्या तापमानामुळे राज्यातील अनेक भागांत आगीच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभुमीवर कोणाला पूजा किंवा हवन करायचे असल्यास सकाळी 9 च्या आधी उरकून घ्या अन्यथा संध्याकाळी 6 नंतर करा असे आदेश बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिले आहेत.

गेल्या काही दिवसांत पाटणा, नालंदा, भोजपूर, रोहतस, बक्सर आणि भाबुआ या ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आगीच्या घटनांचा आढावा घेत असताना नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला. नितीश कुमार यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य सचिव यांना परिपत्रक काढून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.