संघाची माफी मागा: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली- महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना फटकारले आहे. संघविरोधी वक्तव्याबद्दल माफी मागा, नाही तर खटल्याला तयार राहा, असे न्यायालयाने राहुल यांना सुनावले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे झालेल्या सभेत राहुल यांनी महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसच्या लोकांनी केल्याचा आरोप केला होता. त्याविरोधात राहुल यांच्याविरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात आला. हा खटला रद्द करण्यात यावा यासाठी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी सुनावणी झाली असता न्यायालयाने राहुल यांची कानउघाडणी केली. ‘आरएसएसशी संबंधित सर्व व्यक्तींवर तुम्ही सरसकट आरोप कसे करू शकता,' असा सवाल न्यायालयानं राहुल यांना केला.