शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|
Last Modified: लातूर , गुरूवार, 30 सप्टेंबर 2010 (14:43 IST)

17 वर्षांनंतरही बसतात भूकंपाचे धक्के

लातूरमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाला आज 17 वर्ष पूर्ण झाले आहेत. 30 सप्टेंबर 1993 मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता. आज 17 वर्षांनंतरही अनेक लहान मोठे धक्के लातूर व परिसरात बसत असतात.

लातूरमध्ये झालेल्या भूकंपात चार हजारांवर नागरिकांचा बळी गेला होता, तर तब्बल सात हजार जानवरांचा यात मृत्यू झाला होता.
आजही किल्लारी व परिसरात भूकंपाच्या आठवणी ताज्या असून, अजुनही ग्रामीण भागातील लोकांना भूकंपाची धास्ती वाटते.