गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

युतीची चर्चा थांबली, मुख्यमंत्री घेतील आता निर्णय

शिवसेनेन आपल मत आणि आमचं म्हणणं मांडलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका मांडावी, असं शिवसेना नेते अनिल परब यांनी युतीची चर्चा थांबल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता पुन्हा मुंबईत युती होते का नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.  

भाजपचे नेते शिवसेनेवर आरोप करत आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री युतीची भाषा करत आहेत. हा भाजप नेत्यांचा दुटप्पीपणा आहे. भाजपच्या नेत्यांनी बेताल वक्तव्यं थांबवावी असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे. तर युती करायची तर सन्मानाने करा टीका आणि इतर गोष्टी करून युती होणार नाही असे संकेत परब यांनी दिले आहे.