शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 मे 2017 (16:59 IST)

30 मे ला १२ वी चा ऑनलाईन निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या 30 मे रोजी  दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरली जात होती. अखेर राज्य मंडळाकडून अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे. 
 
राज्य मंडळातर्फे राज्यातील 15 लाख 5 हजार 365 विद्यार्थ्यांची बारावीची परीक्षा घेण्यात आली. त्यात 8 लाख 48 हजार 929 मुलांचा तर 6 लाख 56 हजार 436 मुलींचा समावेश आहे. त्याच प्रमाणे विज्ञान शाखेच्या 5 लाख 59 हजार 423 विद्यार्थ्यांनी तर कला शाखेच्या 5 लाख 9 हजार 124 विद्यार्थ्यांनी आणि वाणिज्य शाखेच्या 3 लाख 73 हजार 870 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या 62 हजार 948 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.