मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 मार्च 2018 (15:25 IST)

पेपर तपासणीवर शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार अखेर मागे

बारावीच्या परीक्षेच्या पेपर तपासणीवर राज्यातील शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार अखेर मागे घेण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. यामुळे आता परीक्षा निकाल वेळेत लागणार आहे.
 
आजपासून  पेपर तपासणीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. पेपर तपासणीवर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बहिष्कार टाकला होता. शासकीय आदेश दिल्यामुळे मागण्यांबाबत या क्षणापासून आंदोलन मागे घेत असल्याचं शिक्षक महासंघाने जाहीर केलं.
 
मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जात होती. त्यामुळे बारावीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली होती.
 
तब्बल 80 लाख उत्तरपत्रिका बारावीच्या विविध विषयांच्या तपासणीविना पडून होत्या.शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली नव्हती. नियमानुसार पाच जूनपूर्वी बारावीचा निकाल लावणं आवश्यक आहे. त्यामुळे आता मोठा तिढा सुटला आहे. यामुळे आता सर्व सुरळीत होईल असे चिन्हे आहेत.