एकनाथ खडसेंनी शेतकर्यांचा अपमान केला-नितेश राणे
राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकर्यांचा अपमान केला असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे औरंगाबादेत बोलत होते. खडसेंनी वीज बिलाबाबत केलेले वक्तव्य म्हणजे शेतकर्यांची थट्टा करणारे असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
मोबाईल फोनची बिले भरायला पैसे आहेत, मग वीजबिले का भरता येत नाहीत, असा बोचरा सवाल महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी केला होता. त्यावरून नितेश राणेंनी खडसेंचा समाचार घेतला आहे.
आमदार राणे म्हणाले, सत्तेत आल्यावर भाषा कशी बदलते याचे उदाहरण एकनाथ खडसे यांनी दाखवून दिले आहे. राज्यातील जनतेने याचा विचार करावा, असा सल्लाही नितेश राणे यांनी दिला आहे.
याशिवाय, नितेश राणे यांनी शिवसेनेवरही प्रहार केला आहे. राणे म्हणाले, शिवसेना सत्तेत आहे की विरोधात, हे त्यांनाच अजून माहित नाही. शिवसेना विरोधात बसला तरी विरोधी पक्ष हा भाजपच्या हातचा रिमोट कंट्रोल असेल, अशी घणाघाती टीका राणे यांनी केली आहे.