गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By WD|
Last Modified: पुणे , गुरूवार, 10 एप्रिल 2014 (12:11 IST)

कर्जबाजारी तरुणाकडून कुटुंबातील तिघांची हत्या

एका कर्जबाजारी तरुणाने आपल्याच कुटुंबातल्य़ा तिघांची हत्या केल्याची घटना पुण्यातल्या फातिमानगरमध्ये घडली आहे. सागर गायकवाड याने आई, पत्नी आणि मुलगी यांची गळा आवळून हत्या केली. गेल्या दोन वर्षांपासून सागर हा बरोजगार होता.

सागरने एका बँकेतून कर्ज घेतले होतं पण बेरोजगारीमुळे तो कर्जाचे हफ्ते भरण्यात त्याला अडचणी येत होत्या. याच नैराश्यातून त्याने आपली आई, पत्नी आणि मुलगी यांची हत्या केल्याची माहिती त्याने स्वत: पोलिसांना दिली. त्यानंतर सागरने स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न फसल्यानंतर सागर पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले.

सागर हा उच्च शिक्षित आहे आणि आयटी क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यानं कामही केले होते.