राज्यात जुल आणि ऑगस्टमध्ये दोन टप्प्यांत होणाऱ्या नऊ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची नवी पद्धती राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यानुसार शनिवारपासून (४ जुल) उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरावे लागणार आहेत. तसेच या निवडणुकांसाठी पहिल्यांदाच निरीक्षकही नियुक्त करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
९ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपासून हे बदल लागू करण्यात येत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी दिली.
ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी इच्छुक उमेदवारांना या वेळी प्रथम ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने http://panchayatelection.