शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: कोल्हापूर , शुक्रवार, 22 ऑगस्ट 2014 (11:20 IST)

घोटाळेबाज सरकार हाकलून द्या

राज्यातील घोटाळेबाज सरकारला हाकलून लावा, आम्ही राज्याचा विकास करू, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हमीदवाडा (ता. कागल) येथे गुरुवारी केले. 
 
सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना येथे अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळा अनावरण ठाकरे यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
 
राधानगरी मतदारसंघातून उमेदवारी इच्छुक असलेले प्रकाश आबीटकर, कागलमधून इच्छुक असलेले संजय घाटगे यांनी त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे म्हणाले, सूर्याजी पिसाळ अनेक जण आहेत. सूर्याजी पिसाळ जिथे-जिथे उभे राहतील तिथे त्यांना पाडा. राज्यातील सरकार घोटाळेबाज सरकार आहे.