शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: चाकूर , गुरूवार, 27 नोव्हेंबर 2014 (10:30 IST)

चापोलीजवळ ट्रक-रिक्षाच्या भीषण अपघातात 7 जण ठार

नांदेडहून लातूरकडे भरधाव वेगाने येणार्‍या मालवाहू ट्रकने ऑटोरिक्षास समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सातजणांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना चाकूर तालुक्यालतील चापोली गावाजवळ बुधवार, 26 रोजी सकाळी घडली. यात अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, यात ऑटोरिक्षाचा चुराडा झाला तर रस्त्यावर रक्ताचा सडा पसरला होता. 
 
चापोली येथील खैरुनबी इस्माईल शेख या 70 वर्षीय वृध्देस बुधवारी पहाटेच्या सुमारास अर्धागवायूचा झटका आला होता. यामु ळे खैरुनबी यांना उपचारासाठी देवणी येथे एका ऑटोरिक्षातून (एमएच 24 जे 3211) त्यांच्या कुटुंबातील अन्य नऊजण घेऊन जात होते. सदर रिक्षा चापोलीपासून काही अंतरावर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास असताना नांदेडहून भरधाव वेगाने येणार्‍या मालवाहू ट्रकने (जीजे सीवाय  4857) रिक्षाला समोरून जोराची धडक दिली. यात रिक्षातील इक्बाइल मलंगसाब शेख, जब्बार मलंगसाब शेख, मगदूल मलंगसाब शेख हे तिघे भाऊ, नजमुनबी मलंगसाब शेख ही आई, रुग्ण खैरुनबी ही आजी, अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी येथील हसन पठाण हा मेव्हुणा व रिजवाना हसन पठाण ही बहीण या सात जणांचा गंभीर जखमा होवून मृत्यू झाला तर इरफान पठाण, समीर पठाण हे तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.