गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , बुधवार, 30 जुलै 2014 (11:20 IST)

नरेंद्र मोदी आता मौनेंद्र मोदी झाले आहेत का?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मौनेंद्र मोदी झाले आहेत का? अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. चव्हाण यांनी पहिल्यांदाच मोदींवर शरसंधान साधले आहे. विशेष म्हणजे मोदी यांची ही प्रवृत्ती हुकूशमशहाचीच असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 
 
चव्हाण म्हणाले, मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला स्वप्ने दाखविली होती. ती आता भंगली आहेत. त्यामुळेच उत्तरखंडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत लोकांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी भाजपला नाकारून कॉंग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकले. 
 
परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, सामाजिक विषय, समान नागरी कायदा, राम मंदिर, कलम 370 यावर मोदी यांनी अद्याप  आपले मत स्पष्टपणे मांडलेले नाही, नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.