गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: सोलापूर , मंगळवार, 22 जुलै 2014 (10:48 IST)

नरेंद्र मोदींमुळेच शिवसेनेला जीवदान- अजित पवार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळेच अस्तित्व संपलेल्या सेनेला जीवनदान मिळाल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. पवारांनी सोलापूरात राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात संबोधित केले.

दरम्यान, बार्शीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्याला पवार यांनी सोमवारी सोलापुरात प्रत्युत्तर दिले.

पवार म्हणाले, पावसाळा कमी असल्याने देशात दुष्काळाचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. याची जाण राष्ट्रयादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आहे. या पार्श्वभूमीवरच पवारांनी दिल्लीत मोदींची भेट घेतली होती. परंतु शिवसेनेने या भेटीचे भांडवल केले होते.