शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 16 डिसेंबर 2014 (12:40 IST)

बालकामगारांची ‘तस्करी’ रोखली

बेकर्‍या, हॉटेल्स आणि कारखान्यांमध्ये नोकरीस लावण्यासाठी बिहार येथून आणलेल्या ८३ बालकामगारांची मुंबईत सुटका करण्यात आली. चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून या मुलांना मुंबईत आणण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी ३३ जणांना ताब्यात घेतले आहे.
 
बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यातून काही अल्पवयीन मुलांना कामासाठी मुंबईत पाठवण्यात येणार असल्याची माहिती एका सामाजिक संस्थेला मिळाली होती. 
 
शनिवारी १५० अल्पवयीन मुलांना मुंबईकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली.जनसाधारण एक्स्प्रेसने मुंबईत दाखल होत असताना या मुलांची सुटका करुन ३३ जणांना ताब्यात घेण्यात आले.