शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: कराड , बुधवार, 25 नोव्हेंबर 2015 (11:20 IST)

महाराष्ट्रात मध्यावर्ती निवडणूका : शरद पवार

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज्यात मध्यावर्ती निवडणुका होऊ शकतात असा राजकीय बॉम्ब राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टाकला आहे.
 
कराड येथे पत्रकारांशी बोलाताना शरद पवार म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुक झाल्यानंतर महाराष्ट्रात मध्यावर्ती निवडणूका होऊ शकते.  शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यानंतर राज्यात मध्यावर्ती होऊ शकतात, असे पवार यांनी यापूर्वीही म्हटले होते. दरम्यान, शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
 
दरम्यान, सेना-भाजपची युती तुटणार नसून कार्यकर्त्यांना केवळ दिलासा देण्यासाठी पवार यांनी हे वक्तव्य केले असल्याचे भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.