Last Modified: मुंबई , मंगळवार, 28 जुलै 2015 (12:11 IST)
महाराष्ट्रात हायअॅलर्ट
पंजाब हल्यानंतर राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून सर्व विमानतळांसह, रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेकडून सूचना आल्याने हायअलर्ट जारी करण्यात आल्याचे पोलीस अधिकार्यांकडून सांगण्यात आले. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांना विशेष दक्षता बाळगण्यास सांगण्यात आले आहे.
त्यानुसार मुंबईत सिद्धिविनायक मंदिर, गेट वे आॅफ इंडिया, दूतावास, सर्व प्रमुख रेल्वे स्थानके व अन्य प्रमुख ठिकाणी तातडीने अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.