गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 3 जुलै 2015 (10:22 IST)

मुंबई परत आल्यावर फौजदारीच करतो : मुख्यमंत्री

माझ्यामुळे एअर इंडियाच्या विमानास उशीर झाल्याच्या बातम्या खोट्या आहेत, माझी मानहानी करणार्‍यांवर मुंबईत आल्यावर फौजदारी करणार आहे, असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

त्यांनी ट्विट केले आहे की, विमान उड्डाणास विलंब झाल्याबद्दलची माहिती दिशाभूल करणारी आहे. मी जर विमानात आधीच बसलो असेन तर शिष्टमंडळाशिवाय मी प्रवास करणार नाही असे कसे म्हणू शकेन. शिष्टमंडळाशिवाय मी प्रवास करणार नाही अशी माहिती पुढे येत असेल तर चूक आहे, कारण मी उड्डाणाची वाट पाहत शांतपणे बसलो होतो, याला सहप्रवासी साक्षीदार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरु केली आहे.