मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 28 मार्च 2016 (11:39 IST)

राज्यात तापमानात सातत्याने वाढ

राज्यात बहुसंख्य शहरांचे तापमान चाळिशीवर गेले. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. 
 
मागील आठवड्यापासून मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदवण्यात येत आहे. मुंबईचे कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले. रायगड, मालेगाव, सोलापूर, परभणी, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा या शहरांचे तापमान चाळीस अंशाच्या पुढे होते. बहुतांश शहरांचे किमान तापमान २२ ते २७ अंशाच्या घरात होते.