बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापूर , शनिवार, 13 फेब्रुवारी 2016 (11:08 IST)

रेल्वेच्या धडकेत पाच ठार

येथील आसरा येथे  रेल्वेच्या धडकेत पाच जण ठार झाल्याची घटना घडली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
आसरा पुलाच्या परिसरातील सावतामाळी मंदिराच्या पाठीमागे रूळाजवळ पाच जण मृत झाल्याची खबर विरुद्ध दिशेने जाणाºया  रेल्वेतील कर्मचाºयाने सोलापूर रेल्वे नियंत्रण कक्षाला कळविली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना पाचही मृतदेह अस्ताव्यस्त पडलेले दिसले. एका मृताच्या खिशात डॉक्टरकडे घेतलेल्या उपचाराची चिठ्ठी सापडली. चिठ्ठीवरुन त्याचे नाव परशुराम कलोळे असे असल्याचे पोलिसांनी सांगितले़