शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अमरावती , गुरूवार, 5 मे 2016 (12:32 IST)

वाठोडामध्ये आमीर खानचं श्रमदान

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील गावांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता आमीर खान आज अमरावतीमध्ये पोहोचला आहे.

वाठोडा गावात आमीर खानने श्रमदानाला सुरुवात केली. गावकऱ्यांमध्येही हुरुप चढला आहे. आमीरसोबत अभिनेत्री रिमा लागू, सई ताम्हणकर, सुनील बर्वे हेदेखील श्रमदान करत आहेत. वॉटर कप स्पर्धेत दीडशे गावं  सहभागी झाले आहेत. यापैकी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 60 लाख तर त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी अनुक्रम 30 आणि 20 लाख बक्षीस दिलं जाणार आहे. एखाद्या स्पर्धेच्या माध्यमातून दुष्काळ घालवण्याची ही पहिलीच अनोखी स्पर्धा आहे.